Mahesh gade

Mahesh gade video game lover

25/10/2024
25/10/2024

निवडणूक आयुक्तांच्या अनुमतीनंतर अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार..

जिल्ह्यातील शेतकरी पीक नुकसान अनुदानासाठी पाठपुरावा सुरू!

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाला अतिवृष्टी तसेच पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार त्यांनी ४ ऑक्टोबर रोजी विभागीय आयुक्तांच्या मान्यतेने राज्याच्या मुख्य सचिवांकडे पीक नुकसानीचा अहवाल सादर केला होता. मुख्य सचिवांनी त्यास मान्यता दिली आहे. निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यांच्या अनुमतीनंतर हेक्टरी १३ हजार ८०० रूपयांचे अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील वाडी व वाडी बामणी येथे बैठक घेऊन
नागरिकांशी संवाद साधला. यावेळी स्थानिक प्रश्नांवर चर्चा करुन त्यांनी ग्रामस्थांच्या समस्याही जाणून घेतल्या. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (एसडीआरएफ) मार्फत शेतकर्‍यांना नुकसानीपोटी १३ हजार ८०० रूपयांचे अनुदान दिले जाते. राज्यातील काही जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यावर १३ हजार ८०० रूपयांप्रमाणे अनुदानाची रक्कम जमा होण्यास प्रारंभ झाला आहे.

आपल्या धाराशिव जिल्ह्यातील ५८ पैकी ३७ महसूल मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली नाही. अशा अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिथे अतिवृष्टी झाली, तेथील पंचनामे प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी अतिवृष्टी नाही, मात्र पुराच्या पाण्यामुळे शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तेथील पंचनामे करण्याचे निर्देश आपण जिल्हा प्रशासनाला दिले होते.

निवडणूक आयुक्तांच्या अनुमातीसाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यांच्या अनुमतीनंतर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यावर नुकसान अनुदान प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करीत आहोत.

#पीक_नुकसान #अनुदान #धाराशिव

25/10/2024
05/10/2024
02/10/2024

राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

महात्मा गांधीजींच्या सत्याग्रह, शांतता व अहिंसेच्या तत्वांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक नवी ऊर्जा दिली. त्यांचे हे विचार केवळ देशालाच नाहीतर संपूर्ण जगासाठी आदर्श आहेत.

#महात्मा_गांधीजी

30/09/2024

"श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे शिल्पकार आहेत." - 'मन की बात'ची दशकपूर्ती कार्यक्रमाच्या यशाचे श्रेय पंतप्रधानांनी जनतेला बहाल केले..

एका अध्ययनानुसार या कार्यक्रमामुळे ६०% श्रोत्यांमध्ये राष्ट्र विकासाची तळमळ निर्माण झाली आहे. देशाविषयी सकारात्मक भावना त्यांच्यामध्ये निर्माण होऊन प्रतिदिवशी होणाऱ्या देशाच्या प्रगती विषयी लोकांमध्ये आस्था निर्माण होत गेली..

१० वर्षांपूर्वी ३ ऑक्टोबर २०१४ ला विजयादशमीच्या दिवशी मन की बातचा पहिला कार्यक्रम प्रसारित झाला आणि या वर्षी ३ ऑक्टोबर २०२४ रोजी जेव्हा कार्यक्रमाची दशकपूर्ती होत आहे, तो नवरात्रीचा पहिला दिवस असणार आहे, हा एक पवित्र आणि सुवर्ण योगायोग आहे..

क्रीडा, शिक्षण, अर्थकारण, राजकारण, जागतिक घडामोडी इथपासून थेट शेवटच्या घटकाच्या व्यक्तीच्या प्रगतीपर्यंत असंख्य घडामोडी नागरिकांसमोर मांडत एक सकारात्मक दृष्टिकोन आणि भूमिका माननीय पंतप्रधान यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सातत्याने देशाला दिली..

माननीय पंतप्रधानांच्या अत्यंत उद्बोधक, प्रेरणादायी आणि अंतर्मुख करणाऱ्या वक्तृत्व शैलीमुळे प्रत्येक कार्यक्रमातून नागरिकांची उत्कंठा आणि कार्यक्रमाविषयी आवड नेहमीच वाढती राहिली.. विकास कामे आणि इतर प्रगती कशा पद्धतीने करता येऊ शकते यासाठी नागरिकांची मते, सूचना वेळोवेळी या कार्यक्रमामधून मागवल्या गेल्या. ज्यामुळे कोट्यावधी नागरिकांचा देखील यात प्रत्यक्ष सहभाग लाभला असे म्हणता येईल. आज मन की बात हा कार्यक्रम भारताच्या २२ भाषांसहित विदेशातील १२ भाषांमध्ये सुद्धा ऐकला जातो..

गेल्या रविवारी संपन्न झालेल्या कार्यक्रमात "श्रोतेच या कार्यक्रमाचे खरे शिल्पकार आहेत." असे म्हणत पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेबांनी विनम्रपणे या अद्वितीय कार्यक्रमाचे श्रेय नागरिकांना समर्पित केले..

कोणतेही काम माननीय पंतप्रधानांनी हाती घेतले तर ते अखंडपणे सुरू ठेवणे हा त्यांचा अत्यंत मौल्यवान असा गुण आहे. एखादे काम १० वर्षे सलग चालविणे हे काम वाटते तेवढे सोपे निश्चित नाही. त्यासाठी अनेक अडचणींचा देखील सामना वेळप्रसंगी करावा लागत असतो.. मात्र या सर्वांवर मात करत सातत्याने हा कार्यक्रम चालू राहिला.. कोव्हिड काळात असंख्य नागरिकांना यातून नवीन स्फूर्ती लाभली.

ी_बात

26/09/2024
26/09/2024

Address

Tuljapur
413501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahesh gade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category