ratnagiri_lifestyle

ratnagiri_lifestyle रत्नागिरी मधल्या फोटो विडिओ बातम्या ?

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्ध जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मजलागुनी
:- कवी कुसुमाग्रज
मुपो- मालगुंड रत्नागिरी अश्या सर्व रत्नांची रत्नागिरी बनलेली आहे रत्नागिरी मध्ये आपले स्वागत आहे

03/06/2021

24/03/2021

27/02/2021

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. 'मराठी भाषा गौरव दिन' दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.

"मराठी राजभाषा दिन" ' मराठी दिन' हा १ मे रोजी साजरा करण्यात येतो. १ मे १९६० ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्या दिवसापासून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला. म्हणून १९९७ पासून १ मे हा दिवस 'राजभाषा मराठी दिन'म्हणून साजरा करण्यात यावा असा शासनाने निर्णय घेतला. दिनांक १० एप्रिल १९९७ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे हा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

शिवजयंती कशी साजरी करावीखेळ खेळणेमर्दानी खेळांमुळे लढाऊवृत्ती निर्माण होणे : शिवराय पटांगणात खेळ खेळत. कुस्ती, दांडपट्टा...
19/02/2021

शिवजयंती कशी साजरी करावी
खेळ खेळणे
मर्दानी खेळांमुळे लढाऊवृत्ती निर्माण होणे : शिवराय पटांगणात खेळ खेळत. कुस्ती, दांडपट्टा, घोड्यावर स्वार होणे, तलवार चालवणे अशा खेळांमुळे त्यांच्यात निर्भयता, क्षात्रवृत्ती, अन्यायाविरुद्ध चीड, लढाऊवृत्ती, तसेच नेतृत्वगुण असे अनेक गुण निर्माण झाले.

मित्रांनो, गुणच आपल्या जीवनाचा पाया आहे; म्हणून आपण प्रत्यक्ष मर्दानी खेळ खेळलो, तरच आपल्यात गुण येतील.

काल्पनिक खेळांमुळे विध्वंसकतेकडे वाटचाल होत असल्याने त्यांवर बहिष्कार टाकणे आवश्यक : सध्या मुले संगणकावर काल्पनिक खेळ खेळतात. ते खेळ विध्वंसक आणि विकृत विचार निर्माण करणारे असतात, उदा. विकृत पद्धतीने गाडी चालवणे, कुणालाही बंदुकीने मारणे, एकमेकांना मारणे इत्यादी.

मित्रांनो, अशा खेळांतून मुले मनाने दुर्बळ होऊन विकृत होतात. हे खेळ काल्पनिक असल्याने मुले वास्तवात न जगता कल्पनेच्या विश्वात वावरतात आणि त्यामुळे मुलांना वास्तव जीवन जगणे कठीण जाते. ती आत्मकेंद्रित बनल्याने ‘मला या राष्ट्रासाठी जगायचे आहे’, हा व्यापक विचार त्यांच्या मनात येत नाही. अशा मुलांमध्ये राष्ट्रप्रेमच निर्माण होत नसल्याने ती मुले राष्ट्राचे रक्षण करतील का ? मित्रांनो, आता तुम्हीच सांगा की, आपल्याला संगणकावरील खेळ खेळून विकृत व्हायचे कि छत्रपती शिवरायांसारखे क्षात्रवृत्ती जागृत करून राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी सिद्ध व्हायचे ? आता आपण निश्चय करूया की, संगणकावरील खेळांवर बहिष्कार टाकायचा आणि प्रत्यक्ष खेळ खेळायचा. हीच खरी शिवजयंती आहे. मग कराल ना ?

गोष्टी वाचणे आणि ऐकणे
उत्तम संस्कार करून घेणे : शिवराय नेहमी राम–कृष्ण यांच्या गोष्टी वाचत आणि ऐकत. प्रत्यक्ष घडलेल्या आणि ज्यांमधून देवभक्ती, राष्ट्रप्रेम अन् अन्यायाविरुद्ध चीड निर्माण होईल, अशा गोष्टींचे वाचन केल्यामुळे त्यांच्यातील राष्ट्रप्रेम जागृत झाले. त्यांनी अन्यायी मोगलांना पायबंद घातला.

काल्पनिक आणि खोट्या गोष्टींमुळे विकृती बळावणे : सध्या मुले ‘टॉम अँड जेरी’ यांसारख्या काल्पनिक आणि खोट्या गोष्टी वाचतात अन् ऐकतात. त्यामुळे मुले कल्पनेच्या जगतात वावरतात. त्यांच्यात राष्ट्रप्रेम आणि राष्ट्राभिमान असे गुण निर्माण होत नाहीत. पर्यायाने ती मनाने दुर्बळ होतात.

मुलांनो, मला सांगा की, आपल्याला रामायण, महाभारत यांमधील वास्तव गोष्टी समजून घेऊन शिवरायांसारखे राष्ट्रप्रेमी व्हायला आवडेल कि ‘टॉम अँड जेरी’सारख्या काल्पनिक गोष्टी पाहून मनाने दुर्बळ व्हायला आवडेल ? शिवरायांना सांगूया की, आम्हाला आपल्यासारखे होऊन आदर्श राज्य घडवायचे आहे, यासाठी आम्ही आजपासून वास्तव गोष्टी ऐकू आणि वाचू.

आई-वडिलांना नमस्कार करणे
उद्धटपणा टाळून विनम्रता जोपासणे : शिवाजी महाराज प्रतिदिन आईला नतमस्तक होऊन नमस्कार करत. त्यामुळे त्यांच्यात ‘विनम्रता’ हा गुण आपोआपच आला. जिथे नम्रता असते, तिथेच सरस्वती वास करते; म्हणून त्यांनी अनेक कला आत्मसात केल्या होत्या.

आपल्याला शिवरायांसारखे व्हायचे असेल, तर आपण प्रतिदिन आपल्या आई-वडिलांना नमस्कार करायला हवा. सध्या काही मुले आपल्या आईशी उद्धटपणे बोलतात. त्यामुळे आपल्यात विनम्रता कशी येणार ? आपण शिवरायांना सांगायला हवे, ‘महाराज, आपले गुण आम्ही विसरलो. आम्हाला क्षमा करा. आम्ही आजपासून प्रतिदिन आईला नमस्कार करू आणि आमच्यात ‘नम्रता’ हा गुण आणू.’ मित्रांनो, असे कराल ना ? असे करणे हीच खरी शिवजयंती आहे.

योग्य आदर्श ठरवणे
राम-कृष्ण यांचा आदर्श ठेवणे : शिवरायांचे आदर्श होते, राम आणि कृष्ण. मुलांचे जसे आदर्श असतात, तशी मुले घडतात. आपले आदर्श चांगले असतील, तर आपणसुद्धा तसेच घडू. आपल्या जीवनाचा योग्य आदर्श ठरवणे फार महत्त्वाचे आहे.

चित्रपटातील नायकांचा आदर्श ठेवणे सर्वथा अयोग्य : सध्या चित्रपटातील एखादा नायक, उदा. सलमान, शाहरुख, तसेच ब्रुस ली, रॉक असे मुलांचे आदर्श असतात. मित्रांनो, आदर्शाप्रमाणे ती व्यक्ती घडत असते. वरील आदर्शांमध्ये कोणता गुण आहे की, जो राष्ट्र आणि समाज यांना हितकर आहे ? मित्रांनो, हे पडद्यावर खोटे नाटक करतात; पण त्यांचे वास्तवातील वर्तन आदर्श नसते.

आपण आपला आदर्श असा ठरवावा की, ज्याच्यात सर्व गुण आहेत. जो जसा बोलतो, तसा वागतो. मित्रांनो, शिवाजी महाराज असेच होते; म्हणून त्यांनाच आपला आदर्श म्हणून मानूया.

20/01/2021

खर्‍या अर्थी #प्राचीनकोकणचा आनंद घ्यायचा असेल तर #रत्नागिरी_शहराला भेट द्या. #लालमाती,खड्डे,धूळ,लालघरे/अंगणे आणि बरेच काही !😜😜😝

शब्द अपुरे पडतात ह्या फोटो साठी
14/12/2020

शब्द अपुरे पडतात ह्या फोटो साठी

तुम्ही आमच्या कलाकृती तोडलात पण आमचे विचार नाही तोडू शकत अशी ही आमची संस्कृती आहे जिचा तुम्ही कधी विचारही नाही करू शकत अ...
09/12/2020

तुम्ही आमच्या कलाकृती तोडलात पण आमचे विचार नाही तोडू शकत अशी ही आमची संस्कृती आहे जिचा तुम्ही कधी विचारही नाही करू शकत अशी सुंदरता या जगामध्ये कुठे भेटेल जगातील खूप सुंदर कलाकृती आमच्या या देशात आहेत

ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचे वास्तव्य असलेला ‘थिबा पॅलेस’  हा भव्य ऐतिहासिक राजवाडा रत्नागिरी शहरातील प्रमुख आकर्षण आहे. इ...
05/12/2020

ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचे वास्तव्य असलेला ‘थिबा पॅलेस’ हा भव्य ऐतिहासिक राजवाडा रत्नागिरी शहरातील प्रमुख आकर्षण आहे. इ.स. १८८५ सालापासून म्हणजे सुमारे १३२ वर्षांपासून रत्नागिरीची नाळ ब्रह्मदेशाशी म्हणजेच आताच्या ‘म्यानमारशी’ जोडलेली आहे.
थिबा राजाने ब्रह्मदेशावर सात वर्षे राज्य केले व असे राज्य करणारा तो शेवटचा राजा होता. त्या वेळच्या ब्रह्मदेशावर इंग्रजांनी कब्जा मिळवून तिथे सात वर्षे राज्य करणाऱ्या थिबा राजाचा सगळा मुलुख आपल्या ताब्यात घेतला. त्याने पुन्हा उठाव करू नये म्हणून इग्रंजांनी थिबा राजाला त्याच्या कुटुंबासमवेत १८८५ साली म्यानमार ते मद्रास (आत्ताचे चेन्नई) व मद्रास ते कोकण असा प्रवास करून रत्नागिरीस आणले. त्यानंतर १९१० मधे सुमारे सत्तावीस एकर आणि साडेअकरा गुंठ्यांच्या विस्तीर्ण जागेवर त्याकाळात एक लाख सदतीस हजार रुपये खर्च करून हा प्रशस्त, ब्राह्मी पद्धतीचा, तीन मजली राजवाडा थिबा राजा व त्याच्या कुटुंबीयांच्या वास्तव्यासाठी रत्नागिरीतील सड्यावर म्हणजे सध्याच्या शिवाजीनगर भागांत बांधला गेला. स्वतःच्या मातृभूमीपासून दूर, आपल्या लोकांपासून तुटलेल्या या थिबा राजाचा तीस वर्षांच्या कैदेनंतर १९१९ साली वयाच्या ५८ व्या वर्षी दुर्दैवी अंत झाला. थिबा राजाची ही कहाणी मनाला विषण्ण करून जाते.
अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेल्या `थिबा पॅलेस` मधे तळमजल्यावर संगमरवरी नृत्यागृह आहे. पॅलेसच्या उंच गच्चीवरून समोरच्या सागराचे अथांग दर्शन घडते. राजवाड्याच्या छतावर सुंदर लाकडी नक्षीकाम केलेल्या पट्ट्या लावल्या असून, खिडक्यांना रंगीत इटालियन काचा बसवलेल्या आहेत.
राजवाड्याच्या आतील भागात पुरातन वस्तू संग्रहालय आहे. तळमजल्यावर असलेल्या प्राचीन मूर्ती सुंदर असून अनेक कलारसिकांसाठी वरच्या मजल्यावरीलं चित्रप्रदर्शनाचं नेहेमीच आकर्षण राहिलं आहे. सोमवार सोडून इतर दिवशी ‘थिबा पॅलेस’ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुला असतो.

इथून जवळच असलेल्या `थिबा पॉईंट` जवळ आता जिजामाता गाडर्न उभं आहे. या ठिकाणावरून मोठं सुंदर दृश्य दिसतं. अस्ताला जाणारा सूर्य बघण्यासाठी इथे नेहमीच गर्दी असते. सूर्याचे नारिंगी बिंब क्षितीजाआड जात असताना त्या पार्श्वभूमीवर भाट्ये खाडी, राजिवडा बंदर, समुद्र व उंच भगवती किल्ला खूप सुंदर दिसतो. मनाला हे वातावरण सुखावत असताना आतमधे नकळत कुठेतरी तो दुर्दैवी थिबा राजा आठवत राहातो.

राजापूरची गंगा ही अनेक अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय आहे. खूप प्राचीन काळापासून या स्थानावर गंगा अचानक प्रकट होत असून हे ...
21/11/2020

राजापूरची गंगा ही अनेक अभ्यासकांच्या अभ्यासाचा विषय आहे. खूप प्राचीन काळापासून या स्थानावर गंगा अचानक प्रकट होत असून हे एक भूवैज्ञानिक आश्चर्य मानले जाते. राजापूरच्या उन्हाळे गावातून गंगातीर्थाकडे जाण्याचा रस्ता आहे
गंगातीर्थाच्या चिरेबंदी घाटावर गंगेची चौदा कुंडं असून गंगा प्रकट होताच ही कुंडं भरून वाहू लागतात. मुख्य प्रवेशद्वारासमोरच काशी कुंड असून त्याशेजारील मोकळ्या जागेत वटवृक्षाखाली मूळ कुंड आहे.
येथील अजून एक आश्चर्य म्हणजे पाण्याला गंधकाचा वास येतो व प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे असते. इथल्या कुंडांना वरूण, हिरा, वेदिका, नर्मदा, सरस्वती, गोदा, यमुना, कृष्ण, अग्नी, चंद्र, सूर्य व बाणकुंड अशी वेगववेगळी नावे असून त्यातील काशी कुंड सर्वात मोठे आहे. भारतातील सर्व प्रमुख नद्यांचे पाणी इथे उत्पन्न होते अशी भाविकांची श्रध्दा आहे. येथे गंगा स्नानाचीही व्यवस्था आहे. गंगा प्रकट झाल्यावर राजापूरच्या गंगेला तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त होते.

रत्नागिरी शहरात रत्नागिरी बंदराजवळ रत्नदुर्ग किंवा भगवती किल्ला १२व्या शतकापासून उभा आहे. रत्नागिरीच्या पश्चिमेला एक किल...
10/11/2020

रत्नागिरी शहरात रत्नागिरी बंदराजवळ रत्नदुर्ग किंवा भगवती किल्ला १२व्या शतकापासून उभा आहे. रत्नागिरीच्या पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावर सुमारे १२११ मीटर लांब व ९१७ मीटर रुंद असणारा हा अवाढव्य किल्ला १२० एकरांवर पसरला आहे. त्याच्या बालेकिल्ल्याला ९ बुरुज असून संपूर्ण किल्ल्याला एकूण २९ बुरुज आहेत. किल्ला पेठ, बालेकिल्ला आणि दीपगृह अशा तीन भागांत विभागला आहे. किल्ल्याच्या तीनही बाजूंना समुद्र तर एका बाजूला दीपगृह असल्याने हा परिसर खूपच नयनरम्य दिसतो. पायथ्यापासून १०० मीटर उंचीवर असलेला रत्नदुर्ग चढायला सोपा असून वाहनमार्ग थेट भगवतीच्या मंदिरापर्यंत जातो.
रत्नदुर्ग हा बहमनी काळात बांधला गेला आहे. त्यानंतर पुढे इ.स.१६६० पर्यंत तो आदिलशाहीत होता. १६७० च्या सुमारास शिवाजीमहाराजांनी कोकणातील अनेक किल्ले स्वराज्यात आणले त्याचबरोबर हा किल्लादेखील स्वराज्यात सामील झाला. १७५५ मधे रत्नदुर्ग आंग्रें यांच्या ताब्यात होता, तर त्यानंतर तो पेशव्यांच्या अंमलाखाली होता. १९५० मधे भगवती मंदिराची दुरुस्ती होऊन १९८९ मधे या किल्ल्याची डागडुजी करण्यात आली. अनेक शतकं रत्नागिरी परिसराचा राखणदार व अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणाऱ्या या किल्ल्याला भेट दिल्यावर एखाद्या जाणकार बुजुर्गाला भेटल्याची अनुभूती आपल्याला येते. हा किल्ला त्याच्या उंचीवरून दिसणाऱ्या मोहक परिसरासाठी तेवढाच प्रसिद्ध आहे.

शतकानुशतके इथे समुद्राच्या लाटांच्या आघाताने खडकामधे एक मीटरभर रुंद आणि १० मीटर लांबीची एक घळ किंवा भेग निर्माण झाली आहे...
08/11/2020

शतकानुशतके इथे समुद्राच्या लाटांच्या आघाताने खडकामधे एक मीटरभर रुंद आणि १० मीटर लांबीची एक घळ किंवा भेग निर्माण झाली आहे. ३ ते ५ मीटर खोलीच्या या घळीतून भरतीच्या लाटांचे पाणी खूप जोरात आत घुसुन तेथील खडकांवर आपटते आणि यातून निर्माण होतो १० ते १५ मीटर उंचीचा अवर्णनीय जलस्तंभ!

त्यावेळी कपारीत होणारी पाण्याची प्रचंड खळबळ, रोरावात घुसणाऱ्या लाटांचा प्रचंड आवाज असा थरार अनुभवताना अंगावर रोमांच उभे राहतात. मात्र इथे येताना भरतीची वेळ गाठून येणं चांगलं कारण त्या वेळेस इथे उसळलेल्या जलस्तंभाचा अवर्णनिय नजारा दिसतो. या कपारीत समुद्राचे पाणी घुसून जेव्हा वर उसळते तेव्हा येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज येत नाही त्यामुळे निसर्गाच्या या रौद्र रूपाचे दर्शन घेताना काळजी घेणे आवश्यक आहे.

Address

Ratnagiri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ratnagiri_lifestyle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share