29/08/2026
“आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा अखेर विजय! पुण्यात सरकारला झुकावं लागलं; मागण्या मान्य”
पुण्यात आदिवासी विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक आणि मूलभूत हक्कांसाठी उभारलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. 17 दिवस विद्यार्थ्यांनी केलेल्या उपोषणाची दखल घेत प्रशासनाकडून त्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
शिक्षण, वसतिगृह, शिष्यवृत्ती आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत आदिवासी विद्यार्थ्यांनी आवाज बुलंद केला होता. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली होती.
अखेर प्रशासनाने चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढत विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेतला. त्यामुळे “एकजूट आणि संघर्षाच्या जोरावर हक्क मिळवता येतात” हे पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने दाखवून दिले आहे.
हा केवळ एका आंदोलनाचा विजय नसून, आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्काच्या लढ्याला मिळालेला मोठा विजय मानला जात आहे.