29/03/2015
आम्ही सारे भ्रष्टाचारी
समोर होत असलेला भ्रष्टाचार रोखण्याच सामर्थ तरी आज कुणाकडे नाही, ठरवुन कितीही उपाय केले तरी भ्रष्टाचार संपनार नाही. का ?, कारण पण आहे त्याला. आज प्रत्येकाला आपल काम काढण्यासाठी वा वेळ चोरुन नेन्यासाठी तरी भ्रष्टाचार करावाच लागतो, आणि माणसाच्या स्वभावा नुसार तरी तो त्याला करावाच लागतो. कितीही स्वतःच्या मनावर बंधन घातले तरी काम लवकर करवुन घेण्यासाठी ते जमवावच लागत. आज सरकारी नोकरीत असलेला पुरुष असो वा कोण्या बड्या कंपनीतील कर्मचारी, मुलांच्या शैक्षणिक कागदपत्रे काढण्यासाठी करुन करुन किती दिवस सुट्टी काढेल त्या कामांसाठी?. एक दिवस, दोन दिवस ठिक आहे. पण सरकारी कामांसाठी एक-दोन दिवस पुरेशे नसतात, आणि आणखी दांड्या मारल्या तर गेला मग पगार पण. समजा त्याचा पगार जर १-२ दिवस दांडी मारल्याने कमीत कमी १०००रु कापला जात असेन तर तो माणुस हाच विचार करेल ना की द्या शंभर दोनशे टेबला खालुन आणि करुन घ्या काम. साहजिकच आहे एक तर रोज-रोज त्या कामासाठी जाव लागनार नाही आणि पगार पण बुडनार नाही, वरुन काम पण लवकर होईल. त्याच्या जागेवर कुणी जरी असते तरी हेच करन योग्य समजेल.
आणखीन एक उदाहरन म्हणजे हि आजची तरुन पीढी एवढी ओरडते ना, भ्रष्टाचार बंद करा वैगरे. पण हेच कारटे जेव्हा विना लायसन्स वा हेल्मेट गाडी चालवतांना एखादा ट्राफिक हवालदार ह्याना पकडतो तर का ह्याचे सगळेच अधिकारी नातेवाईक जागे होतात व त्याना फोन करुन हे त्या हवालदाराशी बोलायला सांगत फाईन मध्ये सुट मांगायला सांगतात. आणि जर समजा हे पण शक्य नाही झाल तर २००रु फाईन असला तर ५०रु त्या हवालदाराच्या हातावर ठेवत पळवाट शोधायला भघतात. तेव्हा का ह्यांची सगळी देशभक्ती पणाला लागते ? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना ?.
आणि खुशाल प्रत्येकाने वर तोंड करुन हे नको ओरडायला की आम्ही भ्रष्टाचार करत नाही, भ्रष्टाचाराची परिभाषा म्हणजे फक्त आपले काम काढण्यासाठी टेबलाखालुन पैसे देने होत नाही ? तर एका गरिबा पासुन तर श्रीमंता पर्यंत आपल्या आप्त्येवाईकाच्या लग्नाला रात्री दहा-अकरा नंतर सुद्धा जोरात गाणे वाजवत, नाचत गाजत लोकांची झोप उडवतात हे सुद्धा भ्रष्टाचारतच येत ना ? आणि समजा जर कोणी फोन करुन पोलीसात तक्रार केली की अमुक-अमुक ठिकाणी रात्री दहा नंतर सुध्दा गोंधळ सुरु आहे, तर मी हे नको सांगायला की आपण त्याला ओळखत जरी नसलो तरी कोणत्या शब्दात, कोणत्या स्तरा पर्यंत आणि विषेश म्हणजे कोण-कोणत्या नातेवायकांचे नाव घेऊन त्याला उद्धार करतो. का तो तर भ्रष्ताचारच संपवत होता ना ? त्यात त्याच काय चुकल.कि, त्याने पण शांत झोपायला हव होत वा तुमच्यात येऊन दोन-चार ठुमके लावायला हवे होते.
भ्रष्टाचारावर बोलण्यआधी हे पण समजायला पाहिजे की तो आप-आपल्यातच असतो, आपण तो कसा सेटल करतो ह्यावर त्याची किंमत ठरवायला हवी. काही दिवसापुर्वीच्या एका मराठी मालिकेतील प्रसंग आठवतो, अमुक-अमुक ट्रॅव्हल कंपनीच्या मालकाने त्याच्या अपघात झालेली गाडी परत मिळवण्यासाठी १० हजाराची लाच दिली व पुढच्या प्रवासासाठी बस चालती केली. तर ह्यावर त्या मालकाच्या तरुन मुलीला अस वाटत की हिचे बाबा, स्वतःचा फायदा बघण्यासाठी लोकांना लाच देतात. आणि तिला वाटत कि आपण ह्या सार्या प्रकरनाचा जाब आपल्या वडीलांना विचारावा आणि ती तसे करते सुद्धा. त्यावर तिचे बाबा तिला एक अतिक्षय योग्य जबाब देतात माझ्या मताने तरी.
बाबा - तर तु मला जाब विचारला ना की तुम्ही पैसे दिले ती बस परत मिळवण्यासाठी तर त्याच उत्तर हो आहे, पण मी एवढच उत्तर देत असेल ला तर ते योग्य नाही. कारण मी एक अतिक्षय प्रामाणिक व्यावसायीक आहे, मी माझा व्यवसाय अतिक्षय प्रामाणिक पणे करतो, मी कुणाला लुबाडत नाही आणि कुणाला पैसे देत नाही.
मुलगी - हो फक्त लाच देता.
बाबा - हो देतो मी लाच, पण व्यवसाय वाढवण्यसाठी नाही तर तो चालवण्यासाठी, आणि हो दोघात फरक आहे. हाच नाही तर कोणताही व्यवसाय करायचा असेल तर तडजोड तर कराव्याच लागतात, शेवटी माझा व्यवसाय जेव्हामी सुरु केला तेव्हा मला ही या सार्याचा त्रास झालाच. जागे साठी पैसे, लायस्नससाठी पैसे, ह्यासार्याचा त्रास मलाही झालाच. पण गोष्ट फक्त भारतातच होते हे सांगायचा कृत्घ्न पणा मी करणार नाही, हे सगण्या जगात सुरु आहे आणि ते सुरु राहणारच. शेवटी मला पण माझा व्यवसाय करायचा आहे, आदर्श पणाच्या अतिरेकापोटी माझ्या वर अवलंबुन असलेल्या लोकांचा मी घात नाही करु शकत. मी त्याची पॉसीटिव्ह साईड बघतो, नाही म्हटल तरी माझ्या कडे ५०-६० डायरेक्ट एम्प्लॉईज आहेत, ह्याच्या वर अवलंबुन असलेले त्याचे व्यवसाय, त्यांचे कुटुंब, या सगळ्याचा विचार केला कॅलकुलेट केला तर एकंदरीत मी ५००-६०० लोकांच्या भवितव्याशी ने रोज खेळत असतो.
मुलगी - म्हणजे लाज का द्यावी लागते ह्याच स्पष्ठीकरण देत आहात तुम्ही मला ?.
बाबा - नाही, मी व्यवसाय कसा करतो हे तुला सांगतोय. तर रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलीसाला जेव्हा मी पाच-पंन्नास रुपये जेव्हा टिकवतो तेव्हा भृष्टाचाराला शिव्या देण्यापेक्षा हे सार आप-आपल्यातच आहे हे मी बघतो. कुठल्या परिस्थितीत तो काम करत आहे ? किती पगारात तो काम करत आहे ? किती तास उभ राहुन तो काम करत आहे ? हे बघतो, आणि आपणच हे त्याच्यावर लादल आहे म्हणुन नुकसान भरपायी म्हणुन त्याला देतो.
मुलगी - म्हणजे तेच ना भ्रष्टाचाराला पाठींबा ? आणि एवढा जर त्यांना त्रास होत असेल ना तर नाही पोलीसात भरती होवो, दुसरे काम करा, आमचा काय आग्रह आहे का ?
बाबा - नाही नाही, या स्टेटमेंटचा जरा नीट विचार कर, हे बघ आपण शिक्षणाचा दर्जा उंचावु शकलेलो नाही, आपण सगण्यांना नोकर्या देऊ शकत नाही, अश्यावेळी या लोकांना ह्या नौकर्या करण्या व्यतिरिक्त दुसरा कोणता पर्यायच नाही.
मुलगी - काही नाही , लाच देऊनच नौकर्या मिळवतात ते. बरोबर आहे, घर-दार विकुन, व्याजावर पैसे घेउन हे नौकरीला लागतात.
बाबा - आपली मोलकरीन १००रुपये पगार वाढवुन मागते तर आपण लगेच म्हणतो बापते आता महिण्याला ५०० नाही तर ६००रुपये द्यावे लागतील.शाशे रुपये महिन्याला म्हणहे दिवसाला किती २०रुपये,तेही कष्टाचे, घामाचे. पण दोन दिवस जर तिने दांडी मारली तर तुमची काय वार्ताहत होते ते लक्षात घ्या. म्हणजे २० रुपयाच मोल लक्षात घे. किंमती कड बघु नको, मोला कडे बघ. तर ९०टक्के लोकांना लाचखोरी ही नको असते पण ती करावी लागते नाईलाजास्तव.
मुलगी - म्हणजे काय ह्याना सोडुन द्यायच का ? कायदेशीरच करा ना.
बाबा - नाही तस नाही करायच. आपण माणुस बघायचा हा त्या खुर्चीत बसलेला, परिस्थितीतला,त्याची असह्हायता आपण लक्षात घेतली पाहिजे.सगळ्यांनाच पैश्याची असहायता असते असेच नाही, काही असहायतेचेही बळी असु शकतात. आणि मी जे पैसे दिले ते म्हनजे फ्क आपल्या कस्ट्मर्सचा नुकसान करायच मला काहीच अधिकार नाही, म्हणुन मी शेवटी पैसे दिलेच.
या प्रसंगा वरुन हे लक्षात येत कि भ्रष्टाचाराच्या सुद्धा दोन बाजु आहेत, पण आपण कोणती बाजु निवडतो हे विशेष.
त्यामुळे आदर्शपणाच्या अतिरेकापोटी आपण तो रोखु शकत नाही कदाचीत, पण तरी थोड्या प्रमाणात तरी आपण थांबवुच शकतो ना ?.
पण कितीही केल तरी आपण सारे भ्रष्टाचारीच, आणि सारच जर कायद्याने करायला लागलो तर तस प्रत्येकाने वागायलाही हवेच.
MayUR..? Valavi