16/09/2023
बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू छत्रपती, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळक यांची चरित्रकार धनंजय कीर लिखित विस्तृत आणि सत्यनिष्ठ चरित्रे
धनंजय कीर महाराष्ट्रातील प्रसिध्द चरित्रकार होते. त्यांनी लिहिलेल्या चरित्रात चरित्रनायकाचा व्यक्तिविकास, सत्यनिष्ठ व्यक्तिदर्शन व काळाचे हुबेहूब दर्शन घडते. त्यामुळे त्यांची चरित्रे स्वदेशात व परदेशांत लोकप्रिय झाली. भारत सरकारने त्यांच्या ह्या महत्त्वपूर्ण कामगिरीबद्धल त्यांना 'पद्मभूषण' हा 'किताब देऊन त्यांचा यथार्थ गौरव केला आहे. धनंजय कीर यांनी महाराष्ट्रातील महानायकांची सत्यनिष्ठ चरित्रे लिहिली आहेत. ती पुस्तके संच स्वरुपात अथवा वेगवेगळी देखील आपण कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच मागवु शकता.
१. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१९६६ साली प्रथम प्रकाशित चरित्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असताना लिहिलेले व स्वत: बाबासाहेबांनी वाचलेले हे एकमेव चरित्र आहे. या चरित्रग्रंथातील सर्व तपशील हा बाबासाहेबांच्या नजरेखालून गेला होता. इतिहास, कला, सत्यनिष्ठा, अभिरुची, कालक्रम व समतोलपणा यांचे भान राखून अत्यंत समरसतेने लिहिलेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीवर, व्यक्तिमत्त्वावर, मानसावर व कार्यावर प्रकाश टाकणारा हा चरित्रग्रंथ अप्रतिम असून दलित व बहिष्कृत भारताचे सम्यक दर्शन घडवतो.
८ वे पुनर्मुद्रन । पाने : ६६५ । किंमत : ९००/-
२. राजर्षी शाहू छत्रपती
राजर्षी शाहू छत्रपती नामक मानवतेच्या प्रेषिताची, कर्माने राजपद भोगणाऱ्या पण सेवेने मन, बुद्धी, अंतःकरणाने क्रांतदर्शी असणाऱ्या राजसिंहाची, लोकशाहीच्या पुरस्कर्त्या, कर्त्या लोकसेवकाची, पण व्यक्तिस्वातंत्र्याचे आचरण करणाऱ्या अद्वितीय मानवाची साक्षेपी कथा मा. धनंजय कीर यांनी आपल्या सिद्धहस्त लेखणीने, व्यासंगी चिकित्सक व संशोधनपर अभ्यासाने, समतोल दृष्टीने लिहिली आहे.
६ वे पुनर्मुद्रन । पाने : ६४८ । किंमत : ८५०/-
३. महात्मा जोतीराव फुले
१९६८ साली प्रथम प्रकाशित या चरित्रात महात्मा फुले यांच्या जीवनाचे समग्र, विस्तृत नि यथातथ्य दर्शन घडते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुले यांचे चरित्र लिहिण्याचा मानस धनंजय कीर यांनी पूर्ण केला. महाराष्ट्र सरकारने १९६८ साली या ग्रंथास पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील समाज क्रांतीचे दर्शन घडवणारा हा अमोलीक ग्रंथ अत्यंत वाचनीय, उद्बोधक नी स्फूर्तीदायक आहे. या महापुरुषाचे समग्र चरित्र महाराष्ट्रातील विचारवंतांना, समाजसेवकांना नि राष्ट्रीय कार्यकर्त्यांना मार्गदर्शक ठरेल.
११ वे पुनर्मुद्रन । पाने : ३६६ । किंमत : ४७५/-
४. स्वातंत्र्यवीर सावरकर
१९७२ साली प्रथम प्रकाशित. वीरश्रेष्ठ सावरकरांच्या जीवनकार्याचे, वाङ्मयाचे, त्यांनी चालविलेल्या राजकीय नि सामाजिक, क्रांतिकारक नि भाषाविषयक विविध चळवळींचे हे साकल्याने घडविलेले एकसंध असे दर्शन आहे. त्यांच्या स्फोटक नि रोमांचकारी, ज्वलंत नि महाकाव्यसदृश्य चरित्राचे वास्तव व सत्यदर्शन घडविण्याचा हा एक प्रयत्न आहे. राष्ट्रभक्ती म्हणजे काय, परदास्याच्या शृंखला तोडीत असता देशभक्तांना काय काय हालअपेष्टा भोगाव्या लागतात आणि कोणकोणत्या दिव्यातून जावे लागते ह्याची सम्यक कल्पना वीरश्रेष्ठ सावरकर ह्यांच्या चरित्रातून येते.
चौथी आवृत्ती - २ रे पुनर्मुद्रन । पाने : ७६८ । किंमत : ८७५/-
५. लोकमान्य टिळक
टिळकांच्या जीवनक्रमाचे कथन मागेपुढे न करता त्यांच्या मनोवृत्तीचा विकास, त्यांच्या जीवन- मार्गाची वाटचाल आणि त्यांच्या मनावरील घटना आणि व्यक्तींचा प्रभाव यांचे चित्रण हे पुस्तक करते. त्यांचे जीवनचरित्र आणि व्यक्तिमत्त्व यांच्या विकसनाचे संपूर्ण रेखाटन करताना राजकारण, पत्रकारिता, तत्त्वज्ञान आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य लढा अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेल्या योगदानाचा परामर्श घेतला आहे. थोडक्यात, लोकमान्य टिळकांच्या भव्य व्यक्तिमत्त्वाच्या सर्व छटांचे दर्शन हे चरित्र घडवते.
३ रे पुनर्मुद्रन । पाने : ५२२ । किंमत : ७७५/-
संपुर्ण संच अथवा वेगवेगळे देखील उपलब्ध
सर्व पेपरबॅक पुस्तके टिकाऊ पेपरवर उत्तम छपाई
एकुण वजन : ३.५ किलो
एकुण किंमत : ३८७५/- + कुरिअर : २२५/-
एकुण घरपोहोच किंमत : ४१००/-
सवलत घरपोहोच किंमत : ३७००/- कॅश ऑन डिलिव्हरीसह
--
हा संच अथवा वेगवेगळी पुस्तके घरपोहोच मागवण्यासाठी कॉल / व्हाट्सअप करा : 89 99 50 50 11
अथवा ऑनलाईन विकत घेण्यासाठी :
https://bookvishwa.com/product-category/dhananjay-keer/