21/09/2025
“वेळ नाही...”
बारा तासांचा प्रवास चार तासांत आला,
तरी माणूस म्हणतो – वेळ नाही.
बारा माणसांचं कुटुंब दोन माणसांवर आलं,
तरी माणूस म्हणतो – वेळ नाही.
चार आठवड्यांनी मिळणारा निरोप
आता चार सेकंदांत मिळतो,
तरी माणूस म्हणतो – वेळ नाही.
कधी काळी दूरच्या माणसाचा चेहरा पाहायला वर्ष लागायची,
आज सेकंदात दिसतो,
तरी माणूस म्हणतो – वेळ नाही.
घरात वरखाली जायला लागणारा श्रम,
आता लिफ्टने संपतो सेकंदात,
तरी माणूस म्हणतो – वेळ नाही.
बँकेत तासनतास थांबणारा माणूस,
आता मोबाईलवर काही सेकंदात व्यवहार करतो,
तरी माणूस म्हणतो – वेळ नाही.
आरोग्य तपासण्या काही आठवड्यात होत्या,
आता काही तासांत संपतात,
तरी माणूस म्हणतो – वेळ नाही.
अॅक्टिवा चालवताना हातात हँडल,
दुसऱ्या हातात मोबाईल,
कारण थांबायला – वेळ नाही.
ट्रॅफिक जाम झाला की दोन लेन ओलांडतो,
कारण – वेळ नाही.
पुस्तक वाचायला – वेळ नाही.
आई-वडिलांना फोन करायला – वेळ नाही.
निसर्गात रमायला – वेळ नाही.
पण आयपीएलसाठी – वेळ आहे.
नेटफ्लिक्ससाठी – वेळ आहे.
रील्ससाठी – वेळ आहे.
राजकारणावर चर्चा करायला – वेळ आहे.
पण स्वतःसाठी – वेळ नाही.
जग सोपं, गती वाढली,
तंत्रज्ञान जवळ आलं,
अंतरं संपली, सोयी वाढल्या,
संधी वाढल्या,
पण माणूस म्हणतो – वेळ नाही, स्वतःपासून दूर गेला.
शांत बसून स्वतःशी बोलायला,
स्वतःला समजून घ्यायला,
किंवा काही क्षण निखळ हसायला,
सद्ग्रंथ वाचायला, मनन करायला,
देवदर्शन करायला, नामस्मरण करायला –
तरी – वेळ नाही.
आणि मग एक दिवस येतो,
वेळच निघून जातो,
शेवटच्या क्षणी कळतं –
वेळ होता…
पण आपणच वेळ नाही असं म्हणत राहिलो…
म्हणून आजच ठरवा –
स्वतःसाठी थोडा वेळ राखा,
मोबाईल गरजेपेक्षा जास्त वापरू नका,
नात्यांसाठी थोडा वेळ द्या,
मनासाठी, शांतीसाठी, आयुष्याच्या गाभ्यासाठी
थोडा वेळ जगून बघा.
कारण – वेळ नाही हे सत्य नाही,
ती फक्त सवय झाली आहे…
आणि ती बदलायला हवी.
वेळ चांगली असो अथवा वाईट,
वेळ ही वेळ आहे,
सर्वांशी गोडीने, गुलाबीने वागा,
तरी शेवटच्या वेळी तरी आपली वेळ चांगली राहावी.