19/04/2026
सण --"आखाती "
आदिवासी बहुल क्षेत्रात सण साजरा केला जातो.
----काय आहे परंपरा----
आखाती सणाच्या सात दिवस अगोदर बांबूपासून विणलेल्या व शेणाने सारवलेल्या एका लहान टोपली(दुरडी) मध्ये माती घेऊन त्यात पाच प्रकारचे धान्य पेरले जाते.यात भात,नागली,मका,तूर,उडीद इत्यादी धान्यांचा बियांचा समावेश केला जातो.धान्य पेरलेल्या टोपलीला "गौर" किंवा "गौराई"असे म्हणतात.नंतर पेरलेल्या धान्याला पाणी शिंपडतात.या गौराईला सूर्यप्रकाश व हवा न लागो म्हणून घरातील एका कोपऱ्यात मोठ्या टोपली (झिला) खाली झाकूण ठेवतात,म्हणजे रोप हिरवी न होता,पिवळ्या रंगाची होतात.पुढील सात दिवस गौराईला सकाळ-संध्याकाळ पाणी घातले जाते.या दरम्यान रात्रीच्या वेळी महिला "गौराईची गाणी"म्हणतात.
----गौराईची मिरवणूक----
आखाती सणाच्या दिवसी मिरवणूक काढण्यात येते.तीन-चार वाज्याच्या सूमारास महिला आपआपल्या घरी उगवलेल्या गौराईला कागदी गजरा लावून सजवतात.नैवेदय दाखवून पूजा करतात,नंतर गौराईला उचलून डोक्यावर घेऊन घराबाहेर येतात.सतत झाकूण ठेवल्यामूळे रोपाला 'पिवळा रंग' प्राप्त झालेला दिसतो.
गावातील मंदिरात किंवा गावचा पाटिल यांच्या घरी संपुर्ण गावातील महिला गौराईला घेऊन एकत्र येतात.मोकळ्या जागेत गौराई खाली ठेवून तीच्या भोवती गोल रिंगण धरुण 'कोडई' झाडाच्या काठीपासून बनवलेल्या 'टिपरी' घेऊन गौराईची गाणी म्हणत नाचतात.नंतर पारंपारिक वादय "संबळ"(सांबळ्या,कहाळी) यांच्यासंगे नाचत-नाचत मिरवणूक पूढे चालते.
गौराईला गावाजवळील नदी,तलाव किंवा विहिरीवर नेतात.तिथे पूजा करून उगवलेली गौर (पिवळी रोप) तोडून घेतात व खालील माती-मूळांचा भाग पाण्यात विसर्जन करतात.तोडलेली गौर थोडीशी देवाल अर्पण करुण बाकि उरलेली महिला आपल्या केसात माळतात.
आखाती सणाला नवविवाहीत मूली सासरहून माहेरी येत असतात.हा सण शेवटचा असल्यामूळे या सणाला "बूडीत सण"असे ही म्हणतात.
----उद्देश----
पेरलेल्या धान्यापासून उगवलेल रोप हे योग्य आहे कि कमजोर आहे,याचे परिक्षण आदिवासी बांधव करतात.म्हणजे येणाऱ्या पुढील पावसाळ्यात हे पीक शेतात कस येणार याचा अंदाज आदिवासी शेतकरी बांधव लावत असतो.
जय आदिवासी
जय कणसरा माता
जय निसर्ग देव