10/10/2024
टाटा मोटर्सच्या पिंपरी चिंचवड इथल्या प्लांटमध्ये ते नेहमी यायचे. हा प्लांट रतन टाटांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा होता. इथल्या प्रत्येक कामगारांशी ते भेटायचे आणि संवाद साधायचे. आज रतन टाटा यांच्या निधनाने हे कामागर पोरके झाले. मात्र आजही टाटा मोटर्स कंपनीत काम सुरू ठेवण्यात आलंय.
हजारो कर्मचारी काम करत असलेल्या या टाटा मोटर्सच्या प्लांटमध्ये टाटांचे निधन झाल्यानंतरही काम बंद ठेवण्यात आलेलं नाही. मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा. देशाचं, कामगारांचं नुकसान व्हायला नको असं स्वत: टाटांनी सांगितलं होतं…