Deva Zinjad

Deva Zinjad लिहायचं फक्त माणसांची डोकी नांगरण्यासाठी...
माणसं जोडत रहायची. आजन्म विद्यार्थीच...

15/08/2026
ऐश्वर्य पाटेकर लिखित 'बाई हरत नसते' हे पुस्तक का वाचावे ?प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना जेव्हा कौटुंबिक, आर्थिक कि...
14/08/2026

ऐश्वर्य पाटेकर लिखित 'बाई हरत नसते' हे पुस्तक का वाचावे ?

प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना जेव्हा कौटुंबिक, आर्थिक किंवा सामाजिक ताणामुळे मन निराशेच्या गर्तेत जाते, हे सगळं माझ्याच वाट्याला का? असे प्रश्न निर्माण होतात आणि मन नकारात्मक गोष्टींनी भरून जाते; तेव्हा हे पुस्तक वाचल्यावर वाटते की आपले दुःख ह्यासमोर काहीच नाही. समोरच्याचे दुःख असहनीय असूनही जर तो त्यातून बाहेर पडू शकतो तर आपण का नाही? जास्त सुखाची हाव न करता देवाने जे दिले आहे त्यात समाधान मानत आणि आलेल्या बऱ्या-वाईट प्रसंगांना तोंड देत जीवनात पुढे मार्गक्रमण करणे; अशा पुस्तक वाचनाने सुसह्य होते. आई इंदू, बहिणी - माई, आक्का, तावडी आणि पमी तसेच लेखक स्वतः ( भावड्या) ह्या सगळ्यांनी अनंत दुःखाचे प्रसंग झेलले. पुस्तकाच्या शीर्षकाप्रमाणे इंदूने परिस्थिती समोर कधीच हार मानली नाही. आपल्या मुलांसाठी आणि त्यांच्या भविष्यासाठी ती कायमच कुटुंब आणि समाजाशी झगडत राहिली. गरिबी, अशिक्षितपणा आणि व्यसनाधिनता हे सामाजिक शाप असून त्यातून समाजाने बाहेर येणे खूप गरजेचे आहे हे पुस्तक वाचताना पदोपदी जाणवत राहते. समाजव्यवस्थेत कुटुंबप्रमुख जरी बाप असला तरी कुटुंबाचा पाया ही आईच असते आणि ती जर खंबीर राहिली तर आपल्या मुलांसाठी ती संपूर्ण जगाशी लढू शकते हे पुस्तक वाचताना प्रकर्षाने जाणवते. पुस्तकातील प्रत्येक प्रकरण वाचताना अंगावर अक्षरशः काटा येतो. डोळ्यांना धारा कधी लागतात ते समजत नाही. प्रत्येक प्रकरणातील शेवटची चार पाच वाक्ये तर काळजाला घरच पडतात. दहावी पास झाल्यावर भावड्याचे पुढे काय झाले? त्याचा प्राध्यापक होण्यापर्यंतचा प्रवास वाचायला नक्कीच आवडेल. प्रत्येकाने एकदा तरी विकत घेऊन अवश्य वाचावे आणि संग्रही ठेवावे असे काळजाचा ठाव घेणारे पुस्तक.......

सौ. दिप्ती सुनिल भुजबळ
नेरूळ, नवी मुंबई.
🌱
बाई हरत नसते - कादंबरी
लेखक - ऐश्वर्य पाटेकर
पुस्तकासाठी संपर्क
पेन पब्लिशिंग हाऊस
9890697098

गरीबी,संघर्षाच्या परिस्थितीत खंबीरपणे तोंड देत अंधारलेला काळोख सारुन सुखाच्या चांदण्यांची पेरणी करताना परिस्थिती नावाचे ...
13/08/2026

गरीबी,संघर्षाच्या परिस्थितीत खंबीरपणे तोंड देत अंधारलेला काळोख सारुन सुखाच्या चांदण्यांची पेरणी करताना परिस्थिती नावाचे जू खांद्यावर पेलणाऱ्या माऊली व तिच्या जिद्दी मुलींची कहाणी म्हणजे " बाई हरत नसते " ही आत्मकथन कादंबरी...

******
सर सस्नेह नमस्कार...
काही दिवसांपूर्वी निपेऱ्या व बाई हरत नसते ही दोन्ही पुस्तके सोबतच मागवली.यापैकी निपेऱ्या हे विष्णु वाघ यांचे आत्मकथन वाचून त्यावर सविस्तर अभिप्राय दिला."बाई हरत नसते" वाचायला थोडा उशीर झाला.माझे मुळव्याध आजाराचे ऑपरेशन बीड येथे करण्याचे ठरवून 10 तारीख निश्चित केली.बरोबर पिशवीत न विसरता हे पुस्तक सोबत घेतले.दुपारी शस्त्रक्रिया झाल्यानंतर संध्याकाळी सात वाजता सुट्टी झाली.मेहुणा सोबत होता मग तीन दिवसांनी परत चेकअपला यायचे म्हणून सासुरवाडी जवळ आहे.मग तिथेच राहायचे ठरवले.

शेतातच घर असल्याने निवांत वेळ मिळाला आणि काल व आज दीड दिवसात वाचून पुर्ण केली.कादंबरी वाचताना कधीकाळी एक भाकर तीन चुलीतील देवा झिंजाड सरांच्या पारू आईचा संघर्ष डोळ्यासमोर उभा ठाकला...
गरीबीचा संघर्ष,नात्यातील पती,सासु,नणंद,दीर,जाऊ आणि,नंदाई,भावजय,जावई, भावकी,सवत सर्वांकडून झालेला त्रास,अवहेलना वाचून कित्येक वेळा अंतःकरण गहिवरून आले.वेणुआत्या आणि तिचा भोकरडोळ्या मिलिटरी जवान यांचा खूप मनोमन राग यायचा.माई,आक्का,तावडी व पमी या चार बहिणी म्हणजे या गरीबीच्या घराच्या खांब होऊन परिस्थिती नावाचे जू खांद्यावर घेऊन हा गाडा ओढत राहिल्या.गरीबीमुळे उपजत शहाणपण येत गेले.

जन्मापासूनचा संघर्ष आणि लढण्याचे सामर्थ्य व बाळकडू परिस्थितीनेच शिकवले.कित्येक प्रसंग वाचून ते प्रसंग आठवत गेले.लेखकाच्या जन्मापासून ते दहावी पर्यंतचा सर्व प्रवास मनाला अस्वस्थ करुन गेला.

चार मुली व एका मुलाचे संगोपन करताना इंदुआईची झुंज वाचून नकळत अश्रू आवरणे कठीण झाले.एकमेव आधार अंबरमामा आपुलकीचा चैतन्याचा जिव्हाळा वाटला.चार मुली म्हणजे चार दिशा होऊन आधाराचे खांब बनून झगडत राहिल्या.प्रेमळ साथ देणाऱ्या इंदुआईच्या काही जिवाभावाच्या मैत्रिणी यांनी नात्यांच्या पलिकडे साथ दिली.अपवाद वगळता सर्व संघर्ष हा आपल्याच माणसांशी लढण्यात गेला.कुठलाच सण,उत्सव आनंदात गेला नाही.यात्रेतील खेळणी म्हणून ट्रॅक्टर घेता आला नाही.खेळणीकडे बघून समाधान मानावे लागले.

वाचताना याचे शल्य वाटत राहिले.परिस्थितीने इंदुआईला खंबीर बनवले.अगणित कष्ट उपसून,वेळप्रसंगी उपाशीपोटी राहून चार मुलींचे लग्न करणे सोपे काम नव्हते.परंतु जिद्द,चिकाटी,मेहनत आणि लेकरांसाठी गरीबीशी लढण्याचे आत्मबळ परिस्थिती देत गेली.प्रत्येक आलेल्या संकटांनी परीक्षा घेतली.जीवघेण्या प्रसंगातून केवळ इच्छाशक्ती आणि एका आईचा संघर्ष वाचताना इंदूआई मला मदर इंडिया वाटू लागली...

परिस्थिती कितीही बिकट असो परंतु तिलाही जिद्दीपुढे कधी हार मानावीच लागते.इंदुआईला परिस्थितीने झुंजविले पण या मातेने हार मानली नाही.कितीवेळा मोडलेले घर उभे केले.आपल्या मुलींवर संस्कार केले.मुलाला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले म्हणून आज लेखक प्राध्यापक होऊन नावारुपाला आले.याचे सर्व श्रेय इंदुआईला जाते.संपुर्ण कादंबरी वाचून झाल्यावर काही प्रश्न अनुत्तरित राहिले.दहावी झाल्यानंतरचा ते नोकरी लागल्यापर्यंतचा प्रवास आणि इंदुआईचा थांबलेला संघर्ष,चार बहिणींचे स्वप्न व देवळ्याचे दाजी आणि अंबरमामा यांच्या साक्षीने सुखाचे चांदणे दारी आलेले पहायला,वाचायला मिळाले असते तर आनंद व्दिगुणित झाला असता...

एकंदर परिस्थिती आणि गरीबीचा बाऊ न करता नियतीशी लढा देऊन खंबीरपणे संसाराच्या गाड्याचे जू खांद्यावर घेऊन न हरता बाई जिंकते.कितीही कठीण परिस्थितीत बाई कधीच हरत नसते हे सिद्ध करणारी कादंबरी हे शिर्षक खरे करुन दाखवते.प्रत्येक वाचकाने वाचावी अशी ही कादंबरी खिळवून ठेवणारी आहे. या कादंबरीतील परिस्थिती ही जागतिकीकरणाच्या पुर्वीची असल्याने गावाचे सामाजिक, सांस्कृतिक,वर्णन व ग्रामीण बोलीभाषा यांचा वापर हा काळ सुसंगत आहे.भौगोलिक संदर्भ व वर्णन वाचून संपूर्ण प्रसंग पूढे उभे करण्याचे लेखन कौशल्य संवेदनशील आहे.संतू,झिंग्या,पग्या,गण्या,नित्या व दिवड्या ते दहावीचे मित्र या बालमित्रांची मैत्री ही निखळ वाहत्या झऱ्यासारखी जागोजागी प्रवाहीत करते... मित्रांच्या संगतीत काही क्षण दुःख विसरुन आनंद देतात.हे सर्व वाचून मला माझा संपुर्ण भूतकाळ पुढे उभा राहिला.माझेही बालपण असेच गरीबीची गेले.वडिल बालपणीच वारले.आई आणि बहिणीने मोलमजुरी करुन शिकवले.मोठे बंधु वडिलांसमान प्रेमळ स्वभावाचे होते.ही परिस्थिती मी भोगल्याने मला माझा संघर्षकाळ आठवला.लेखकाने प्रांजळपणे कुठेही आडपडदा न ठेवता,जे घडले ते सत्य मांडले आहे.भावड्या ते ऐश्वर्य पर्यंतचा प्रवास व संघर्ष निश्चित सोपा नव्हता..तो शब्दात मांडणे कठीण आहे..पुढील वाटचालीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा..
*****
बाई हरत नसते...
लेखक-ऐश्वर्य पाटेकर
प्रकाशन-पेन पब्लिशिंग हाऊस,पुणे
लेखक संपर्क -9822295672
*******
आपला स्नेहांकित....
सारंगधर कुंडलिकराव काळे
मु.पो.पिंपरखेड बुद्रुक
ता.घनसावंगी जि.जालना
संपर्क - 9322128012

घरपोच पुस्तक 9890697098

 #हेडाम* कादंबरीतील धनगरी स्त्रीजीवनावर प्रकाश टाकणाऱ्या बोलक्या प्रतिक्रिया अवश्य वाचा @ सौ.अपर्णा जगताप बलॉग राईटर ---...
13/08/2026

#हेडाम* कादंबरीतील धनगरी स्त्रीजीवनावर प्रकाश टाकणाऱ्या बोलक्या प्रतिक्रिया अवश्य वाचा
@ सौ.अपर्णा जगताप बलॉग राईटर
--------------------------------------------
ही नागू विरकर यांची कादंबरी अलीकडेच 6 वी आवृत्ती पेन पब्लेकेश हाऊस कडून प्रकाशित झाली आणि ती मी पूर्ण वाचून काढली..
मानदेशातील भटक्या मेंढपाळाचे प्रवासवर्णन, दुष्काळी भाग, त्यावर चित्रांकित वर्णन करून लिहिलेल्या गोष्टी...
भटकंती करणारा हा मेंढपाळ आपल्या कोकरांना जगविण्यासाठी गावोगाव फिरणारा त्याची धडपड पाहून आम्हावाचकांना भारावून सोडताना नवीन व्यथा, हुंकार नागू (नायक) यांचा संघर्षमय जीवन प्रवास आम्हा वाचकांना थक्क करून सोडतो...
धनगर वाड्यातील अनेक कुटुंबांच्या जीवनशैलीचे वैशिष्ट्य सणवार, चालीरीती, परंपरा, नृत्य, ढोल, ठोक्यावरील गाणी.. मला इथे वाचायला मिळाल्या आणि न्यातही झाल्या...
अन्न,वस्त्र,निवारा आणि त्याहून मौलाचे शिक्षण... यासाठी करावा लागणारा संघर्ष... हे वाचल्यावर ही संपूर्ण कादंबरी मला माझ्या जवळची वाटून राहिली...
लेखकाची रानटी पण आपल्याच मातीतील वाटणारी जवळचीच बोलीभाषा मला वाटली...
भटक्या जाती जमातीतील मुलांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी त्यातून जिद्दीने तुमच्यासारखा एखादा मुलगा मुलगी संघर्षाच्या छातीवर बसून मात करणारा यशस्वी विद्यार्थी मला इथे वाचायला मिळाला...
नागू वीरकराचा मुक्या प्राण्यांवरचं प्रेम चौथीच्या वर्गात शिकत असतानाच चुलीशी आलेला भावनिक नातं स्वतः भाकरी करून खातो. हा सर्वात संघर्षमय जीवन प्रवास मला भावला. पुढेही स्वतः स्वयंपाक करून शिक्षण घेत घेत पुढे चाललेला नायक मला वाचायला मिळाला..
बारीक बारीक सूक्ष्म वर्णन वाचून मी अचंबित झाले...

*बाल वयात इतकं शहाणपण इतकं बळ कुठून तुमच्यात आलं*
देवा समान गुरु तुम्हाला लाभले विरोध पत्करून ध्येयाने तुम्हाला पुढची दिशा दर्शविली गुरु शिष्य असं प्रेम मला जास्त भावनिक तिकडे घेऊन गेलं. निसर्गातील घडामोडी, मेंढीचे फायदे, रोग, आजार.. हे आपल्या कल्पनेने अचूक बांधणे इथे मला एक 'मेंढपाळ' साक्षरतेपेक्षा कमी नाही वाटला प्रत्येक आजारावर गावठी रामबाण मिरॅकल सारखं उपचार करणे, हे कोणी पी.एच.डी पेक्षा कमी नाही. त्यांची बोलीभाषा जसेच्या तसे इथे वर्णनात्मक रूपाने मांडलेली आहे त्यात कुठलाही ठेकेखोरपणा मला वाचताना आढळला नाही..

देवापुर येथील रयत शिक्षण संस्थेत एकत्र शिकत असताना त्यांचा जीवन प्रवास मी वाचला आणि प्रत्यक्षात माझ्या मेंदू पटलावर कोरून ठेवून पाहिला ही...
मला फक्त श्रद्धा अंधश्रद्धा यात थोडं खटकलं...
संघर्ष रुपी वास्तववादी जीवनपट एका चित्रपटासारखे माझ्यासमोर या कादंबरी वाचनातून उमटत होते...
*हेडाम* ही कादंबरी वाचत असताना सतत तुमच्या मेंदू पटलावर बाबासाहेबांचे ब्रीदवाक्य शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आणि शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो कोणी याला प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही तुम्ही हे आत्मसात करून ठेवले, याबद्दल मला फार अभिमान वाटला तुमचा...🙏

नक्कीच *"हेडम"* ही कादंबरी शालेय विद्यार्थ्यांसाठी एक मोलाची देणगी ठरेल.. विद्यार्थ्यांसाठी नक्कीच ही कादंबरी प्रेरणादायी आणि वास्तवाला धरून असणार आहे...

*हेडाम* या कादंबरीच्या नायकाची आई ही माऊली साधी, भोळी, निरक्षक. 'पण' साक्षरतेचे अफाट ज्ञान जणू काही पूर्वजात घेऊन आलेला वारसाच... वेळोवेळी (नायकाला) आपल्या लेकाला पुढील शिक्षण घेण्यासाठी अहोरात्र कष्ट करून लेकासाठी उभी राहणारी ही एक आईच करू शकते.. तिची माया, ममता, काळजी मला एका आईत इथे वाचायला मिळाली..
पूर्वीच्या काळी स्त्रियांना चूल आणि मूल काही चुकले नाही. काहींना परिस्थिती, घरातील माणसे, समाजातील भीती, चालीरीती यात स्त्रीची घुसमट होत गेली...
*"पण"* शाहू, फुले, आंबेडकर, सावित्रीबाई यांनी शिक्षणाची कवाडे आपल्यासाठी खुली करून दिली. स्त्रियांना शिक्षण घेता यावे त्यांनी निरक्षक न राहता साक्षरतेच्या वाटेने चालावे म्हणून समाजातील तळागाळातील स्त्रियांना शिक्षणासाठी या महामानव (नायक) आणि महा मानवी (नायिका) यांनी समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेऊन ते फलास प्राप्त करून नेले. म्हणून आज स्त्री स्वालंबी झाली आहे ती उच्च शिक्षण घेऊन उच्च पदावर नोकरीही करीत आहे...
अशा नायक नायिकांना माझा त्रिवार अभिवादन...🙏🌿💐🌿🙏

मात्र काही अपवाद स्त्रीचा उच्च शिक्षण घेऊन ही माहेर,सासरच्या इच्छा,आकांक्षा आपल्या शिक्षणाला गुणवत्तेला बाजूला ठेवून मूकपणे लेक, सुनेचे नाते निभावत आहे. स्त्रीला विरोध करणारे हे मुळात बाहेरचे नसतातच ते तिच्या घरातीलच असतात बाहेरच्यांना ति न जुमानता धीट पणाने सामोरे जाऊन लढूही शकते. पण जर विरोध हा घरातूनच आला तर स्त्रीला मागे खेचणारा पहिला विरोध आपल्याकडूनच येतो समाज तर नंतरचा भाग झाला..
मी इथेच थांबते...
आणि आपणास खूप खूप शुभेच्छा देते🪴💐
आपली पुढील आवृत्तीस माझ्याकडून सदिच्छा व्यक्त करते...🙏🪴🙏

*धन्यवाद,*
मानसशास्त्रीय समुपदेशक
सौ अपर्णा बेंगळे/जगताप
फोन नंबर:- *9850808341*

माझी ओळख खालील प्रमाणे...
मी एक ब्लॉग राईटर आहे, पुस्तक सखी, स्व लिखाण.. कविता लिहिणे.. सामाजिक कार्य, विनामूल्य बाल संस्कार वर्ग चालवते...
🙏🙏🌳🌳🙏🙏

पुस्तकासाठी संपर्क 9890697998

*माननीय देवा झिंजाड सर*,  आपली 'एक भाकरी तीन चूल' ही कादंबरी वाचून मन हेलावून गेले. पारूच्या तीन लग्नांतील उपासमार, जाती...
13/08/2026

*माननीय देवा झिंजाड सर*,

आपली 'एक भाकरी तीन चूल' ही कादंबरी वाचून मन हेलावून गेले. पारूच्या तीन लग्नांतील उपासमार, जातीभेद आणि पितृसत्ताक छळाचे जिवंत चित्रण इतके प्रभावी आहे की, प्रत्येक पान वळताना हृदय दचकते. ग्रामीण महाराष्ट्रातील बोलीभाषेतील संवाद आणि खऱ्या घटनांवर आधारित उस्फूर्त लेखन वाचकाच्या अंतरात्म्याला झिंजाळून टाकते.

'एक भाकरी तीन चूल' ही ओळखच पारूच्या जिद्दीचे आणि विजयाचे प्रतीक आहे. गरिबीचे भयंकर रूप, स्त्रीची लढाऊ वृत्ती आणि समाजातील माणुसकीचे दर्शन यांमुळे ही कथा प्रेरणादायी ठरते. पुरणपोळी-आधणाचे रूपक घरगुती सत्तेचे सखोल विश्लेषण करतात. मराठी साहित्यातील एक खास कलाकृती म्हणून हे पुस्तक साहित्यप्रेमींना अवश्य वाचावे.

धन्यवाद!

श्री प्रविण जाधव
कृषी विकास अधिकारी,(वर्ग १),
जिल्हा परिषद यवतमाळ

📌 आवृत्ती ४० वी
🌿 अभिप्राय क्र. १४९७
📚 एकूण अभिप्राय ८९१०
📍पृष्ठसंख्या ४५४

🍁9890697098 🌼
घरपोच पुस्तकासाठी WhatsApp करावे.🌿

#सगळंउलथवूनटाकलंपाहिजे #एकभाकरतीनचुली #देवाझिंजाड #अभिप्राय #पुस्तक #रीडर्सकोम्मुनिटी #साहित्यप्रेमी #मराठी #समीक्षण #कादंबरी #पुस्तक #वाचक ,

(Ek bhakar tin chuli, sagale ulthavun takale pahije, Menduchi mashagat, Deva zinjad, Marathi book, novel, kadanbari, poem)

Address

Pune

Telephone

+919890697098

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deva Zinjad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category