12/03/2026
#प्रेक्षक_प्रतिक्रिया
#महानाट्य_महाभिज्ञा_यशोधरा
दि. 8 मार्च शाहू कलामंदिर,सातारा येथे 'महाभिज्ञा यशोधरा ' हे महानाट्य उत्तम कथा,छान दिग्दर्शन आणि खुप चांगल्या अभिनयामध्ये पाहण्याचा योग आला.महाभिज्ञा यशोधरा या नाटका मधील काही प्रसंग मला खुप आवडले.
रोहिणी नदी पाणी प्रश्न : सिद्धार्थ यांनी विचारले, "पाणी महत्त्वाचे की मानवी रक्त?" त्यांनी दोन्ही बाजूंना पटवून दिले की, युद्धाने फक्त विनाश होईल आणि शेवटी पाणी तर मिळणारच नाही. त्यांनी पाणी वाटपाचे एक समान आणि न्याय्य धोरण आखून दिले. सिद्धार्थ आणि यशोधरा यांनी हे दाखवून दिले की, कोणतीही समस्या युद्धाने सुटत नाही, ती चर्चेने सुटू शकते.
जेव्हा सिद्धार्थ गौतमांनी गृहत्याग केला, तेव्हा यशोधरा यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पण त्या खचून गेल्या नाहीत. त्यांनी आपल्या भावनांवर नियंत्रण मिळवले आणि लहानग्या राहुलच्या संगोपनाची जबाबदारी समर्थपणे पेलली.
एक स्त्री म्हणून त्यांनी आधी आपल्या पतीचा त्याग स्वीकारला आणि नंतर आपल्या एकुलत्या एका मुलाला (राहुल) स्वतःच्या हाताने धम्माच्या मार्गावर पाठवले. त्यांनी आपल्या मुलाला 'वारसा' म्हणून राजवैभव नाही, तर 'सत्य आणि ज्ञानाचा' मार्ग मागण्यास सांगितले.
यशोधरा यांचा हा प्रवास एका राजकुमारीपासून सुरू होऊन एका महान अर्हत भिक्खुणीपर्यंत पोहोचला, जो आजही करोडो लोकांसाठी प्रेरणादायी आहे.
यशोधरा या स्वतः एक राजकन्या होत्या, तरीही नंतरच्या काळात त्यांनी 'भिक्खुणी' होऊन घरोघरी जाऊन भिक्षा मागणे स्वीकारले. एका राणीने भिक्षापात्र हातात घेणे, हा आपल्या 'मी' पणाचा (Ego) पूर्णपणे त्याग होता.
वरील सर्व प्रसंग या नाटकामध्ये पाहताना सिध्दार्थ गौतम आणि माता यशोधरा डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.तीन तास खुर्चीवर कधी गेले समजलेच नाही.एक एक प्रसंग पाहताना मनामध्ये प्रेम,त्याग,करुणा,मैत्री हेच भाव उमटत होते आणि हेच विचार जगाला वाचवू शकतात कालही,आजही आणि उद्याही.'महाभिज्ञा यशोधरा ' या महानाट्याचे प्रयोग महाराष्ट्रातील अनेक शहरातील नाट्यगृहांमध्ये सुरू आहेत. जीवनातील पैसा,पद,प्रतिष्ठा, संपत्ती हे सर्व संपणारे आहे.शाश्वत राहतात ते उत्तम चारित्र्य,उत्तम संस्कार, मानवता,मैत्री,करुणा,प्रेम,आणि त्याग.आणि हेच यशोधरा आणि सिध्दार्थ गौतम बुद्धाचे जीवनचरित्र आहे.असे अनेक उत्तम प्रसंग आपणास या नाटकात पाहायला मिळतील म्हणून आपण सर्वांनी हे नाटक पहावे आणि आपलं जीवन अधिक आनंदी करावे.
अमित चव्हाण, सातारा.
पुढील प्रयोग
शनिवार १४ मार्च दुपारी ४ वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण
रविवार २९ मार्च दुपारी ४ वाजता लता मंगेशकर नाट्यगृह, मीरा रोड
मंगळवार ३१ मार्च रात्री ८ वाजता शिवाजी मंदिर,दादर
फोन बुकींग- संतोष जगताप- 9833625375/ सिद्धार्थ काळे 9920493513/प्रितेश मांजलकर -9619422601